दुःखद..
तो प्रसिद्ध होता म्हणून
त्याच्यासाठी देश हळहळला..
पण हजारो सिद्ध बळीराजाने
अंधारातच आपला देह टांगला..!!
किती घरे उध्वस्त झाली
उभ्या संसाराची माती झाली..
ना वाहिनेने त्याची दखल घेतली
ना वाचा वृत्तपत्राला फुटली..!!
जो तो उजेडाला नमन करतो
अंधाराला कोण पुसतो..
किती दिवे फडफडती वादळात
हात त्यावर कोण धरतो..!!
सिद्ध असो वा प्रसिद्द असो
किंवा असेना का कोणी उपेक्षित..
जाणारा हा माणूसच असतो
तरीही राहतो तोच दुर्लक्षित..!!
त्या म्हणीत असावे तथ्य
जग सारे आहे मिथ्य..
आपणच आपले सगेसोयरे
जीवनाचे हेच अंतिम सत्य..!!
--सुनील पवार..
1,813
People Reached
110
Engagements

No comments:
Post a Comment