

============
|| रेंज ||
=====
मोबाईलमधे डोकं
खुपसलेलं पाहून
ती
मला म्हणाली,
हल्ली मोबाईल
सतत रेंजमध्ये दिसतो
अन माणूस मात्र
नेटवर्क
हरवल्या सारखं
वागतो..!!
मी चमकून पाहिलं
तिच्याकडे
अन
सावरून उत्तरलो
तसं नाही
पण
मार्केटिंग कॉलचा
सतत भडिमार
किती वेळ सहन करणार..?
आणि
सहन शक्तीचा अंत हा
कुठेतरी
ठरलेलाच असणार..!!
उत्तरली ती खोचक
म्हणाली
ते कळलंच आहे
बोलण्याचं तुला नेहमीच वावडं
पण स्क्रीनवर झळकणाऱ्या
त्या
रंगबिरंगी जाहिरातीचा काय..?
तिथे मात्र रिस्पॉन्स
समजू नको तू
मला काही कळत नाही
अन हे ही येतय हा लक्षात
तुलाही त्याचा कंटाळा
अजिबात येत नाही..?
मी मिश्किल हसलो
उत्तरलो
तू समजते तसचं घडते
असं नाही..
आणि प्रत्येक मोबाईलवर
जाहिरात असतेच असंही नाही..
पण तुला ते दिसणार नाही
कारण
संशयाच्या भुताला बांधणारा
गंडा दोरा
अजून तरी बनलेला नाही...!!
आता चढवला तिने सूर
म्हणाली
ठाऊक आहे मला
वादळं ही पेल्यातली असतात..
पण तुलाही कळायला हवं
ती नेमकी जन्म कुठे घेतात..
आणि
निर्माण झालेली ही वादळं
विनाकारण तसेच
दुर्लक्षित मुळीच नसतात..!!
आता नमतं घेतलं मी
म्हणालो
खरं आहे तुझं
जग जवळ आलंय
पण
संपत चाललाय संवाद
घराघरात नाहक
वाढत जातोय विसंवाद..
अपेक्षित आहे
आणि व्हायलाच हवी ग
प्रत्येकाच्या मूल्याची
यथोचित मोजदाद..!!
ती हसली खुदकन
म्हणाली
चलो देर आये दुरुस्त आये
लौट के बुद्दु घर को आये..
साठा उत्तराची कहाणी
आता खरी सफल झाली
हरवलेली माणसं
पुन्हा रेंजमध्ये आली..!!
****सुनिल पवार...
✍🏽
😀
तिच्याकडे
अन
सावरून उत्तरलो
तसं नाही
पण
मार्केटिंग कॉलचा
सतत भडिमार
किती वेळ सहन करणार..?
आणि
सहन शक्तीचा अंत हा
कुठेतरी
ठरलेलाच असणार..!!
उत्तरली ती खोचक
म्हणाली
ते कळलंच आहे
बोलण्याचं तुला नेहमीच वावडं
पण स्क्रीनवर झळकणाऱ्या
त्या
रंगबिरंगी जाहिरातीचा काय..?
तिथे मात्र रिस्पॉन्स
समजू नको तू
मला काही कळत नाही
अन हे ही येतय हा लक्षात
तुलाही त्याचा कंटाळा
अजिबात येत नाही..?
मी मिश्किल हसलो
उत्तरलो
तू समजते तसचं घडते
असं नाही..
आणि प्रत्येक मोबाईलवर
जाहिरात असतेच असंही नाही..
पण तुला ते दिसणार नाही
कारण
संशयाच्या भुताला बांधणारा
गंडा दोरा
अजून तरी बनलेला नाही...!!
आता चढवला तिने सूर
म्हणाली
ठाऊक आहे मला
वादळं ही पेल्यातली असतात..
पण तुलाही कळायला हवं
ती नेमकी जन्म कुठे घेतात..
आणि
निर्माण झालेली ही वादळं
विनाकारण तसेच
दुर्लक्षित मुळीच नसतात..!!
आता नमतं घेतलं मी
म्हणालो
खरं आहे तुझं
जग जवळ आलंय
पण
संपत चाललाय संवाद
घराघरात नाहक
वाढत जातोय विसंवाद..
अपेक्षित आहे
आणि व्हायलाच हवी ग
प्रत्येकाच्या मूल्याची
यथोचित मोजदाद..!!
ती हसली खुदकन
म्हणाली
चलो देर आये दुरुस्त आये
लौट के बुद्दु घर को आये..
साठा उत्तराची कहाणी
आता खरी सफल झाली
हरवलेली माणसं
पुन्हा रेंजमध्ये आली..!!
****सुनिल पवार...


No comments:
Post a Comment