Tuesday, 25 August 2020

थोड्याच अवधीत येतील बाप्पा

 *बालगीत*

।। बाप्पा ।।

========

थोड्याच अवधीत,

येतील घरी बाप्पा..

दरमजल करीत,

गाठतील ते टप्पा..!!


विसावतील पाटावर,

बसतील सुंदर मखरात..

अकरा दिवसांचा,

उत्सव सजेल घरात..!!


पाहुण्यांची असेल,

रोज घरीं वर्दळ

लाडू मोदाकांची,

छान होईल चंगळ..!!


रूप साजिरे,

देखणे गोजिरे छान..

बाप्पा तुम्हास पाहता,

आमचे हरपते भान..!!

*चकोर*✍🏼

Monday, 24 August 2020

आजही बरसत आहे

 आजही बरसत आहे..


आजही बरसत आहे

तो कालही बरसत होता।

तिला भिजविण्याचा 

तो आनंद उपभोगत होता।


मग तिची मर्जी असो नसो

त्याला कसली पर्वा नसते।

तरीही ती वेडी फुलत राहते

वेळीअवेळी पदर ओलावत राहते।


तो निघून जातो एके दिवशी

सोडून तिच्या प्रेमास अन् तोडून हृदयास।

ती साठवून ठेवते त्याच्या ओल्या आठवणी

अन् पोसत राहते

तरु वेलीस, समस्त मानव जातीस।

--सुनील पवार..✍️

राखी

 || राखी ||

======

नात्याच्या घावाने 

हृदय छिन्नविच्छिन्न झालेले 

जागोजागी शब्दांचे ओरखडे 

हातावर झेललेले

त्यात माझे हातही फाटलेले

असं असताना

तुझ्या एका दिवसाच्या 

व्यवहारी राखीच्या मलमाने

हे ओरखडे कितपत बरे होतील?

याबद्दल मन सांशक आहे..!!


कदाचित होतीलही बरे

पण ती ओढ कुठून आणणार?

मला माहीतही नाही

तू येणार की नाही येणार?

आलीस तर बरेच आहे

अन्यथा

हे जखमेचे हात 

अश्वत्थाम्या प्रमाणे विव्हळत

तेलवाटीची प्रतीक्षा करणार?


असो..

पण चिंता करू नको

आताशी जखमेची सवय झालीय

पण तरीही इतकं लक्षात ठेव

की तुझ्या सुखाच्या बातमीचा

वाराही पुरेसा आहे

काही क्षण शीतलता देण्यास

आणि

राखीच्या सणाचा सुगंध

निरंतर दरवळत राहण्यास..!!

***सुनिल पवार...✍🏼

Sunday, 23 August 2020

आतुरता बाप्पाच्या आगमनाची..

 बाप्पाच्या आगमनाची..


आतुरता बाप्पाच्या आगमनाची

आता शिगेला पोहचलीय।

संसर्गाचा फैलाव जागोजागी

मन काळजीने घेतलंय।


पण विश्वास आहे मनात आमच्या

आलं विघ्न हे सरून जाईल।

तुझ्याच कृपाशीर्वादाने बाप्पा

आमचा विजय नक्की होईल।


पण तरीही बाप्पा काळजी आम्ही घेऊ

सरकारी सूचनांचे कसोशीने पालन करू।

तसाही तू आमच्या हृदयात वसतो

तुझं हृदयातून दर्शन घेऊ अन् पूजन करू।

--सुनील पवार..✍️

आठवणी गणपती उत्सवाच्या:-

 आठवणी गणपती उत्सवाच्या:-

(अनुभव लेख)


गणपती आणि नवरात्रोत्सव जवळ आले की मला माझ्या एका मित्राची प्रकर्षाने आठवण येते, तो म्हणजे माझा बालमित्र विजय ठाकूर. 

विजय म्हणजे सळसळता उत्साह, विजय म्हणजे खळखळता प्रवाह, कोणालाही क्षणात आपलंस करून घेणारा एक किमयागार. त्याचं व्यक्तिमत्वही तितकंच रुबाबदार शिवाय अतिशय विनयशील आणि नम्र असल्यामुळे परिसरात तो सगळ्याना सुपरिचित होता.असा हा विजय माझा खास मित्र होता. 


गणपती यायच्या आधी साधारण तीन महिने तो माझ्या मागे लकडा लावायचा. म्हणायचा, सुनील! ह्या वर्षी मखर बनवणार ना? मी पण मग नाही म्हणून त्याची फिरकी घ्यायचो. माझा नकार ऐकून तो हिरमुसला व्हायचा मग त्याचा पडलेला चेहरा पाहून मग मलाच दया यायची आणि म्हणायचो, बघू! करू काहीतरी. बस माझ्या तोंडून इतकं ऐकलं तरी त्याची कळी खुलायची. काय करणार? कस करणार? मला असंच मखर हवं तसंच हवं असा अट्टाहास त्याने कधीच केला नाही. ते फेसबुकवर तुम्ही म्हणता ना! "तू फक्त हो म्हण" अन् "तुझ्यासाठी काहीपण" असाच विश्वास होता त्याच्या मैत्रीमध्ये. मखर बनवायचं काम सुरु झालं की तो नियमित येऊन सोबत बसायचा. काय हवं नको ते विचारात रहायचा. पडेल ते काम मदतरूपी करत बसायचा. विभागातील बहुतेक मित्रांच्या मखरांची ऑर्डर माझ्याकडे असायची पण हा पट्टया मला कधीच विचारायचा नाही की ह्यातील माझ मखर कोणत म्हणून? मी सुद्धा त्याला शेवटपर्यंत सांगत नव्हतो. 


गणपती येण्याच्या दोन दिवस आधी तो त्याच्या घरच्या कामात मग्न असायचा व कधीतरी मधेच येऊन कानोसा घेऊन जायचा. असं करता करता गणपती बसण्याचा दिवस यायचा तेव्हा तो रात्रीपासून माझी चातकासारखी माझी वाट पहायचा पण मखर न्यायला म्हणून यायचा नाही. त्याला खात्री असायची की मखर वेळेत लागणार आणि सुनील म्हणजे मी स्वतः येऊन लावून जाणार म्हणून तो निर्धास्त असायचा. मग मी सुद्धा ठरलेल्या वेळेत त्याच्या घरी मखर घेऊन हजर होत असे. माझ्या हातातील मखर पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे खुशीचे भाव लपत नसत. 


त्याला अपेक्षित असणारा मखर लागला की मग माझं कौतुक करताना त्याचं तोंड दुखत नसे. किंबहुना त्याला पक्की खात्री असायची की हाच मखर आपल्या घरी लागणार त्या दृष्टीने तो बाकीची तयारी म्हणजे इतर सजावट लाईट संयोजन करून ठेवायचा. इच्छित मखर लागल्यावर खुश झालेला विजय गणपती आल्यापासून ते गणपती जाईपर्यंत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला तो माझ्याबद्दल सांगत राहायचा माझी ओळख त्यांची करून घ्यायचा. अशा तऱ्हेने त्याचे सगळे पाहुणे, नातेवाईक मला चांगलेच ओळखू लागले होते. 


काही वर्षांनी ट्रान्झिट कॅम्पमधील आपला मुक्काम हलवून तो माहिमला पुनर्रचित इमारतीत रहायला गेला. तिथे गणपतीचे पहिले वर्ष होते तेव्हा शिरस्त्याप्रमाणे दोन महिने आधीच तो माझ्याकडे हजर झाला व मला म्हणाला सुनील! ह्यावर्षी मी आखिल माहीम गणेशदर्शन स्पर्धेत भाग घेणार आहे यावर तुझं काय मत आहे? त्याच्या प्रस्तावावर मी सहज म्हणालो घेऊन टाक! बघुया काय करायचं ते.

मी सहज पठडीतलच उत्तर दिलं पण त्यालाच माझा होकार समजून तो कामाला सुद्धा लागला. 

त्यावर्षी गणपतीच्या कृपेने त्याचं मखर सुंदर आणि वेळेच्या आधीच तयार झालं आणि आधल्या रात्री मी ते लावलं मात्र तिथेच तो म्हणाला, सुनील! आपण जिंकलो! आणि खरच झालंही तसंच.

ठरलेल्या दिवशी परीक्षणासाठी परीक्षक आले. त्यावेळी परीक्षक म्हणून चंद्रलेखाचे श्री.मोहन वाघ होते आणि सजावट होती तिरुपती बालाजीची. मोहन वाघांनी विजयला सजावटीच्या निर्मिती बद्दल काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची त्याने अगदी समर्पक अशी उत्तर दिली ती ऐकून मोहन वाघ समाधान पावले व त्यांनी आम्हा दोघांचे व कलाकृतीचं खूप कौतुक केले. ते ऐकून त्या दिवशी आम्ही भरून पावलो. 

यथावकाश निकाल जाहीर झाला आणि विशेष म्हणजे आमच्या कलाकृतीला माहीम विभागात प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले. मग काय, विजयची स्वारी एकदम खुश झाली व पेढे आणि स्मृतिचिन्ह घेऊन माझ्या घरी हजर झाली. 


अशीच जेमतेम दोन वर्ष उलटली असतील आणि एकेदिवशी घरी निरोप आला की विजय ट्रेनमधून पडला व त्याला इस्पितळात दाखल केले आहे. तो निरोप ऐकून मी सुन्न झालो व तसाच तडक सायन हॉस्पिटलला पोहचलो तेव्हा तेथील दृश्य हेलावणार होतं. सगळ्याना हसवणारा विजय आज असह्य जखमांनी विवळत होता. त्या रात्री जवळजवळ १०० ते १५० मित्र हॉस्पिटल मध्ये तळ ठोकून होते. सुदैवाने कालांतराने विजय बरा झाला पण कायमचा जागेवर बसला. आता चालू शकत नव्हता. स्वावलंबी विजय परावलंबी झाला होता. त्या कारणाने त्याला नोकरी सुद्धा गमवावी लागली पण त्याचा मालक दयाळू होता. विजयवर त्याचा विशेष जीव होता. विजयाच्या उपचाराचा सर्व खर्च त्यानेच केला होता शिवाय आर्थिक मदतही बरीच केली होती. 

काही महिन्यांनी विजय बराच सावरला. त्याला मानसिक आधार देण्याच काम आम्ही मित्रांनी चोख केल होत. बहुतेक मित्र संध्याकाळच्या वेळेस त्याला भेटून जात होते. मी सुद्धा वेळ मिळेल तसा संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन तासंतास गप्पा मारत असे, त्याच्या चेहऱ्यावर हास्य पेरण्याचा प्रयत्न करत असे.


बघताबघता पुन्हा गणपतीचे दिवस येऊन ठेपले आणि विजयाच्या जीवाची घालमेल सुरु झाली. नोकरी नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाली होती. आता पूर्वीसारखा खर्च परवडत नव्हता. सुदैवाने त्याचे आईवडील पूर्वीपासूनच कामाला जात होते पण त्यांना पगार अगदी कमी होता शिवाय ते सुद्धा विजयच्या अवस्थेने खचले होते, शरीराने थकले होते. आपल्या तुटपुंज्या पगारात कसंतरी भागवत होते.

त्याच्या मनाची घालमेल ओळखून मी त्याला स्पर्शातूनअश्वस्थ केले. 

सालाबादप्रमाणे गणपती येण्याच्या दिवशी सकाळी मी त्याच्या घरी जाऊन गणपती मखरात बसवले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बरेच काही सांगून गेले. त्यावेळी गणपतीच्या पाच दिवसात आम्हाला पूर्वीचा विजय भेटला होता. 


दिवस असेच सरत होते, वर्ष सरत होते.अधूनमधून मी त्याच्याकडे जात असे तेव्हा त्याच्या थट्टा मस्करीला उत येत असे. प्रत्येक  गणपती सणाला न चुकता त्याच्या घरी मखर लागत होता, गत स्मृतीना उजाळा मिळत होता पण कुठपर्यंत? आमची पाठ सरताच पुन्हा एकटेपणा विवंचना ह्यात तो हळूहळू खचत गेला आणि एके दिवशी जगाला सोडून निघून गेला. 

अपघातानंतर जेमतेम सहा सात वर्ष काढली ह्या कालावधीत तो बरंच काही शिकवून गेला. त्याच्या गणपतीच्या निमित्ताने होणाऱ्या माझ्या नवीन कला आविष्काराला तो पूर्ण विराम देऊन गेला. 

 --सुनील पवार..✍️

कोई आता नहीं

 कोई आता नहीं..


खाली पड़े है सोफ़े 

कोई घर आता नहीं।

दूरियां बढ़ाने वाला

ये दौर क्यों जाता नही।


राह तकती आँखे

घर सुना पड़ा है।

मन की गलियारों में

ये कौन रोड़ा बना हैं।


दिन खुशियों के है

पर ख़ुशियां नदारत है।

ज़ाहिर करू तो कैसे

क़ैद में इबादत है।


दिया जला है उम्मीद का

दिल में अब भी चाहत है।

तुम घर पर आए बाप्पा

बस मन को इतनी राहत है।

--सुनील पवार..✍️


#kavita #poetry #love #hindi #shayari #hindipoetry #poem #hindikavita #marathi #writersofinstagram #hindiquotes #shayri #urdupoetry #writer #kavi #poems #shayar #quotes #lovequotes #hindishayari #poet #maharashtra #gulzar #marathikavita #instagram #poetrycommunity #hindipoem #india #rekhta #bhfyp

Thursday, 20 August 2020

अपना काम करो..

 अपना काम करो..


अपना काम करो

फूलों की तरह जियो।

चंद घड़ी की ज़िंदगी को

सुगंध से भर दो।


अंजाम जो भी हो

कर भला तो हो भला।

तोड़ने वाले हाथों को भी

तुम सुगंधित कर दो।

--सुनील पवार..✍️

भेट स्वीकार चॉकलेटची

 भेट..


अगदी सहज विरघळणारी

चव जिभेवर रेंगाळणारी..

भेट स्वीकार चॉकलेटची

वाढवेल प्रेमाची खुमारी..!!


🍫Happy chocolate day 🍫

--सुनील पवार..✍️

राजस समीक्षा

 आजच्या दैनिक 'सकाळ'ने 'सप्तरंग'पुरवणीत 'चपराक'ने प्रकाशित केलेल्या सुनील पवारलिखित 'राजस भाग्य' कादंबरीची यथायोग्य दखल घेतली आहे. दैनिक सकाळ वृत्तपत्र समूहाचे मन:पूर्वक आभार. ज्यांनी हा परिचय करून दिला त्या विनोद पंचभाई यांनाही धन्यवाद. ही कादंबरी जरूर वाचा. 


उत्कंठा वाढवणारी भावस्पर्शी कादंबरी 


परमेश्वरानं आपल्याला दिलेलं अनमोल जीवन, सुंदर रीतीनं जगण्यासाठी सर्वसामान्यांची अविरतपणे धडपड चाललेली असते. हे आयुष्य जगताना सगळ्यांनाच विविध टप्प्यांवर काही ना काही वळणं घ्यावीच लागतात. मात्र येणार्‍या प्रत्येक वळणावर चांगली माणसं भेटतीलच असंही नाही! लौकिकार्थानं अगदी ‘सोन्याचा चमचा’ तोंडात घेऊन आलेल्या एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सर्व सुखसोयींनी समृद्ध झालेलं आपल्या बघण्यात येतं. त्याला जन्मभर कुठल्याही गोष्टींची ददात नसते. याउलट एखाद्या व्यक्तीचं आयुष्य दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकल्यासारखं सदैव वाटेवरील काट्याकुट्यांनी भरलेलं असतं! अशावेळी आपण नियतीला किंवा नशिबाला नावं ठेऊन मोकळे होतो. राजसच्या नशिबी आलेलं दोलायमान जीवन लेखक सुनील पवार यांनी ‘राजस भाग्य’ या आपल्या कादंबरीच्या माध्यमातून अतिशय परिणामकारकरित्या अधोरेखित केलं आहे. ही वाचनीय कादंबरी पुण्यातील ‘चपराक प्रकाशन’तर्फे नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.

अगदी नकळत्या वयात, आई जग सोडून गेल्यावर राजसची झालेली सैरभैर अवस्था, मग काही काळ लाभलेली आजीची भक्कम साथ मात्र नंतर सावत्र आई घरात आल्यानं आणि टारगट मित्रांच्या संगतीमुळं अभ्यासाकडं होणारं दुर्लक्ष, त्यामुळं वडिलांकडून मिळणारा मार इत्यादी प्रसंग जणू आपल्या डोळ्यांसमोर घडत आहेत, असं ही कादंबरी वाचताना प्रकर्षानं जाणवतं! ‘लळा, जिव्हाळा शब्दच खोटे, माशा मासा खाई! कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही!’ या गदिमा यांच्या अविस्मरणीय गीतासारखी राजसची त्यावेळी स्थिती होते. 

बालपण सरल्यानंतर घडण्या-बिघडण्याच्या वयात राजसच्या सुदैवानं शेजारी राहणार्‍या मानलेल्या आईची व बहिणीची-पूर्वाची त्याला समर्थ साथ लाभते. तसंच शाळेतील वर्गशिक्षिका असलेल्या बाईंमुळं त्याची गाडी थोडी रूळावर येते. बाईंच्या आश्वासक आधारामुळं त्याच्यात आत्मविश्वास जागृत होतो. त्याच्या जगण्याला उभारी मिळते. आठवीत दोनदा नापास झालेला राजस बाईंच्या मार्गदर्शनानं आणि पूर्वाची साथ लाभल्यानं अभ्यासात कमालीची प्रगती करतो. त्याच्या वागणुकीनं वडीलसुद्धा प्रभावित होतात आणि त्याला हवी ती मदत करतात. नंतर दहावीच्या वर्गात असताना मानसी राजसच्या आयुष्यात येते. तिची साथसंगत लाभल्यानं आणि मुळातच दोघंही अभ्यासात अत्यंत हुशार अ

ऋतू..

 ऋतू..


ऋतू येतात ऋतू जातात

प्रितीचे अंकुर नित्य नवे फुटतात

कधी बहरतात, कधी कोमेजतात

तरीही

आठवणीची फळे त्यास धरतात..!!


क्षण येतात क्षण जातात

क्षणा क्षणाने आयुष्य बदलतात

कधी हसतात, कधी आसवे गळतात

तरीही 

ते मनात घर करुन राहतात..!!

--सुनील पवार..✍️

म्हणूनच..

 म्हणूनच..


खरं तर मला म्हणायचं नाही

बी माय व्हॅलेंटाईन

कारण तू तर माझ्या हृदयात वसते

आणि तसंही

एका दिवसाची प्रेमाला गरज नसते..!!


पण इतकं कारण पुरेसं नाही

केवळ हृदयात असूनही चालत नाही..

आणि तहान पाण्याशिवाय भागात नाही 

म्हणूनच मी माझं प्रेम व्यक्त करतोय

कारण जगाची तमा मी बाळगत नाही..!!


हॅप्पी व्हॅलेंटाईन डे...💞

--सुनील पवार..✍️

भस्म..

 भस्म..


रात्र दबकत आली

अन् जाळून पळून गेली..

उघड्या डोळ्यांनी केवळ

चौकात मेणबत्ती जाळली..!!


वणवा पेटला चहु दिशेला..

आग क्षणार्धात भडकली..

काच तडकली तुकडे झाले 

जनता क्षणभर हळहळली..!! 


जळणारी जळून गेली

चर्चा राखेची झाली..

नग्नता चेकाळलेली

भस्म फासून साधू झाली..!!

--सुनील पवार..✍️

स्वप्नांची पहाट..

 स्वप्नांची पहाट..


पहाटेच्या प्रसन्नतेची

भूल मनाला पडते..

भाळलेल्या शब्दांतुन

नकळत काव्य उतरते..!!


रणरण उन्हाची असते

त्यातही ती मारवा होते..

एक झुळूक मखमली

क्षणात गारवा देते..!!


सांज रमणीय असते

रंग उधळीत ती येते..

कातरवेळही टळून जाते

अन् रंगत डोळ्यात सजते..!!


मग चांदण्या पेरत

नकळत रात्रही अवतरते..

चंद्राच्या गोड मिठीत

स्वप्नांची पहाट होते..!!

--सुनील पवार..✍️

पोस्टमन

 पोस्टमन…

कधीकाळी म्हणजे साधारण ८० च्या दशकापर्यंत तरी पोस्टमन हा अगदी आपल्या जिव्हाळ्याचा विषय होता.. खाकी गणवेश, डोक्यावर खाकी पट्टीदार टोपी आणि खांद्याला भलीमोठी खाकी झोळीवजा बॅग अडकवून, उन्हातानाची पर्वा न करता, कधी सायकलवर तर कधी मैलोंमैल पायपीट करत खेड्यापाड्यात तहानभूक हरपून प्रत्येक घरात पत्ररूपी सुख दुःखाची विभागणी करणारा, कुणाच्या ओठी हसू तर कुणाच्या डोळ्यात अश्रू आणणारा एकमेव जीव म्हणजे पोस्टमन होय. तशी शहरात सुद्धा काही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती म्हणा. तेव्हा आबालवृद्ध त्याची चातकाप्रमाणे वाट पाहत असत. आपल्या मूळ घरापासून दूर शहरात कामानिमित्त राहणाऱ्या चकारमण्याची ख्यालीखुशाली कळण्याचे एकमेव साधन अथवा माध्यम किंवा महत्वाचा दुवा म्हणजे तेव्हा पोस्टमन हाच एकमेव भक्कम आधार होता. 

असा हा हवाहवासा वाटणारा पोस्टमन त्याकाळी जणू प्रत्येक घराचा सदस्य होता. घरात अशिक्षित वडीलधारी मंडळींना त्यांची पत्रे वाचून दाखवणे, अथवा शहरात राहणाऱ्या मुलास पत्र लिहून देणे इतकंच काय मनिऑर्डर्सच्या पैशाची देवाणघेवाण सुद्धा त्याच्यावर विसंबून डोळेझाकपणे पार पडत होती. इतका विश्वास त्यावेळी पोस्टमन काका,दादावर असायचा आणि तो सार्थ असायचा हे विशेष. पोस्टमन काका म्हणा,दादा अथवा मामा म्हणा, नात्याच्या बंधनात बांधलेला हा पोस्टमन आपल्या ब्रीदला जागून काळवेळेचं भान न राखता, ड्युटीचा कोणताही बाऊ न करता, अगदी निःशुल्क सेवा प्रदान करत होता म्हणूनच तर तो जनमनावर राज्य करत होता. 

असा हा लोकप्रिय पोस्टमन नुसता घरापूरता मर्यादित नव्हता तर व्यापार उद्योग, कार्यालयात सुद्धा त्याचा दबदबा होता. इतकंच काय, तर भारतीय चित्रपटातही मानाचं स्थान मिळवून होता. त्या काळी पोस्टमनशी निगडित एखादे दृश्य अथवा गाणे हमखास चित्रपटात असायचे. ‘डाकिया डाक लाया’, ‘संदेसे आते है’ चिट्ठी आई है’ इत्यादी गाणी त्याचीच द्योतक आहेत. 


पुढे काळ झपाट्यानं बदल गेला. माणसाच्या जीवनात संगणकाने शिरकाव केला त्यानंतर पोस्टाला हळूहळू उतरती कळा लागू लागली अर्थात यास केवळ संगणक कारणीभूत नव्हता तर खाजगी कोरियर कंपनीने निर्माण केलेली स्पर्धा सुद्धा पोस्टाच्या अधोगतीला कारणीभूत ठरली. तरीही खाजगी सेवा ही खाजगी कंपन्या कार्यालयापूरती मर्यादित असल्यामुळे काही अंशी का होईना पोस्टमनचा घरोबा अबाधित होता. पण त्यानंतर आलेल्या मोबाईल क्रांतीने पोस्टमनचा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. मोबाईलमुळे जग जवळ आल्याने पोस्टमन दुरावला. ज्या ख्यालीखुशालीसाठी आठवडे महिने ताटकळत राहावे लागत होते तीच ख्यालीखुशाली आता निमिषात कळू लागली. इतकेच काय व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून लोकं एकमेकांना नियमित भेटू लागले मग पत्रावर अवलंबून राहण्याचे दिवस झटक्यात सरले आणि त्याचबरोबर पोस्टमनशी संपर्क न उरल्याने, पोस्टमनचा घराघराशी असलेला तसेच घराघराचा पोस्टमनशी असलेला जिव्हाळा संपृष्ठात आला.

जिथे जिव्हाळाच संपला तिथे तक्रारींनी सहज शिरकाव केला आणि त्यातूनच पोस्टवर अजूनही आस्था असणाऱ्या लोकांनी पाठवलेली पत्र अथवा पुस्तके वेळेत न मिळणे किंवा ती कधीच न मिळणे अथवा उडवाउडवीची उत्तरे मिळणे असे प्रकार सुरू झाले. पूर्वी घरच्या पोस्टमनला खडानखडा माहिती असायची तीच माहिती आता विचारली असता पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करा अशी उत्तरे मिळतात. अर्थात सर्वच पोस्टमन तसे नाहीत पण प्रमाण वाढते आहे असेच म्हणावे लागेल. अजूनही काही पोस्टमन आहेत जे माणसाला आणि त्या पूर्वीच्या जिव्हाळ्याला विसरलेले नाहीत. उदाहरण द्यायचे झाले तर मुंबईच्या मायानागरीत मी राहत असलेल्या विभागात बरीच वर्षे एक मालवणी पोस्टमन होते. त्यांचे आणि माझे संबंध अगदी तसेच पूर्वीसारखे जिव्हाळ्याचे होते अगदी ते निवृत्त होईपर्यंत तसेच होते. वाढत्या कुटुंबाच्या समस्येमुळे मी विभागातच दुसरीकडे भाड्याने राहायला आलो असता ते सातत्याने माझ्या बँकेचे अथवा कार्यालयाचे साहित्य किंवा सरकारी कागदपत्रं, पत्ता बदललेला नसताना सुद्धा अगदी न चुकता घरी आणून देत असत. पण ते निवृत्त झाले आणि हा जिव्हाळा संपला. आता उरला आहे तो फक्त व्यवहार. 

ते निवृत्त झाल्यानंतर मला पत्ता बदलून घ्यावा लागला हे सांगायला नको.  नवीन पोस्टमन कधी येतो आणि कधी जातो हेच कळत नाही. पण तरीही पोस्टाची आणि पोस्टमनची विश्वासार्हता अजूनही टिकून आहे. काही अपवाद वगळता जनमनात असलेली त्याची विश्वासू प्रतिमा अजूनही तशीच आहे.  


सुदैवाने डबघाईला आलेल्या ह्या पोस्टाच्या उद्योगास सरकारी हाताचा भक्कम आधार मिळाला आणि बचत योजना, बिल भरणा केंद्र, आधार कार्ड संबंधित कामे तसेच इतर सरकारी उपक्रमाअंतर्गत बहुतांश कामे आता पोस्टाच्या माध्यमातून होत आहेत. या शिवाय पार्सल वगैरे आहेतच पण त्याचे प्रमाण आता कामी झाले आहे पण तरीही आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात पोस्टाचे अस्तित्व अजूनही टिकून आहे आणि पर्यायाने पोस्टमन टिकून आहे हे ही नसे थोडके.

--सुनील पवार..✍️

असर..

 असर...


किसी के 

संगत का असर

दो तरह से 

हो सकता हैं।

या तो 

आदत लगती है

या फिर 

छूट जाती है।

पर अपने मामले में 

असर दो तरफ़ा रहा

मुझे 

आदत लग गई

और

तुम्हारी छूट गई।

--सुनील पवार..✍️

स्वच्छंद पक्षाप्रमाणे..

 स्वच्छंद पक्षाप्रमाणे..


स्वच्छंद पक्षाप्रमाणे

उडावेसे वाटते कधी कधी 

झुगारून बंधने सारी

वाटते घालावी गवसणी

ह्या विस्तीर्ण आकाशाला

अन् पाऊलखुणाही 

न दिसाव्या कोणाला..!!


पण जबाबदारीच्या कात्रीने

स्वतःच छाटलेल्या पंखांनी

जिथे उडी मारणेही अशक्य

तिथे उडावे तरी कुठवर?

म्हणूनच आता 

मी आकाशालाच कुंपण घातलंय 

अन् त्यालाच 

आपले विश्व मानतोय खरोखर..!!

--सुनील पवार..✍️

मैंने ख़ुशी को चुना..

 मैंने ख़ुशी को चुना..

मैंने ख़ुशी को चुना
दुखों के साथ जीते जीते।
मैंने मुस्कुराना सीखा
अश्कों के घुट पीते पीते।
ये सहज बात नही
फिर भी मैंने अपनाई है।
इस मुस्कुराते चेहरे ने
अपनों से ठोकर खाई है।
आँखों मे नमी छुपाकर
ख़ुशी का प्याले छलकते है।
इतना तो जान गए हम की
लोग दुखों का मजाक उड़ाते है।
--सुनील पवार..✍️
Image may contain: one or more people, text that says 'मैंने ख़ुशी को चुना.. मैंने ख़ुशी को चुना दुखों के साथ जीते जीते| मैंने मुस्कुराना सीखा अश्कों के घुट पीते पीते| ये सहज बात नही फिर भी मैंने अपनाई है| इस मुस्कुराते चेहरे ने अपनों से ठोकर खाई है| आँखों मे नमी छुपाकर ख़ुशी का प्याले छलकते है| इतना तो जान गए हम की लोग दुखों का मजाक उड़ाते है| सुनील पवार..'
भारत जगताप, Pratiksha Kurhade and 14 others
14 Comments
Like
Comment
Share

Friday, 14 August 2020

क्या नाम दू तुझे..

 क्या नाम दू तुझे..

तेरी तरफ आते हुए
मैंने फ़िजा को देखा।
फूल वहां खिले
जहां तूने पाँव रखा।
क्या नाम दू मैं तुझे
गुल कहूँ या गुलशन।
तेरे आने से महक उठा
मेरे जीवन का आँगन।
--सुनील पवार..✍️
Image may contain: flower, text that says 'क्या नाम दू मैं तुझे तेरी तरफ आते हुए मैंने फ़िजा को देखा| फूल वहां खिले जहां तूने पाँव रखा। क्या नाम दू मैं तुझे गुल कहूँ या गुलशन। तेरे आने से महक उठा मेरे जीवन का आँगन। सुनील पवार..'


7

ख़्वाब..

 ख़्वाब..

ख़्वाब देखा करो
ख़्वाब देखना अच्छा है।
पर सोचना जरूर
क्या सचमुच वो सच्चा है।
ख़्वाबों की ये दुनिया
वैसे तो बड़ी रंगीन होती है।
पर उनको पाने की डगर
उतनी ही संगीन होती है।
बंद आँखों से देखे गए
ख़्वाब अक़्सर टूट जाते है।
खुली आँखों से भी देखो
फिर भी कुछ पल छूट जाते है।
चाहे इरादा पक्का हो फिर भी
कुछ ख़्वाब अधूरे रह जाते है।
जो पूरे नही हो पाते कभी
वो सिर्फ ख़्वाब बनकर रह जाते है।
--सुनील पवार..✍️
Image may contain: text that says 'ख़्वाब देखा करो ख़्वाब देखना अच्छा है| सोचना जरूर क्या सचमुच वो सच्चा है| ख्वाब.. ख्वाबों की ये दुनिया वैसे रंगीन होती है| उनको पाने की डगर उतनी ही संगीन होती है| बंद आँखों से देखे गए ख़्वाब अक़्सर टूट जाते है| खुली आँखों से भी देखो फिर भी कुछ पल छूट जाते है| camrtime चाहे इरादा पक्का हो फिर भी कुछ ख़्वाब अधूरे रह जाते है| जो पूरे नही हो पाते कभी वो सिर्फ ख़्वाब बनकर रह जाते है| सुनील पवार..'
252
People Reached
11
Engagements
7
1 Share
Like
Comment
Share

मोरपंख..

 मोरपंख..

मोरपंख डोईवर,
ओठात बासरी..
रूप तुझे सावळे
हे कृष्णमुरार..!!

गोपाळांसवे खेळे,
गोपिकांना छेडे..
पण जगास दिले
अद्वैत प्रेमाचे धडे..!!

गोकुळास तारले
असुरांचे करून मर्दन..
यशोदेचा कान्हा
तू देवकीचा नंदन..!!

गीता सांगून अर्जुनास
तू केले प्रेरित जगास..
घडवून महाभारत
केला अधर्माचा ना..!!

लीला तुझी पाहून
तुज म्हणती लीलाधर..
तव मुखकमल पाहता
जुळती माझे कर..!!
--सुनील पवार..✍️
Image may contain: text that says 'मोरपंख डोईवर, ओठात बासरी| सावळे रूप तुझे तू कृष्णमुरारी| गोपाळांसवे खेळे गोपिकांना छेडे| तू जगास दिले अद्देत प्रेमाचे धडे| मो र पं गोकुळास तारले करून असूर मर्दन| यशोदेचा कान्हा तू देवकीचा नंदन। ख गीता सांगून अर्जुनास केले प्रेरित त्यास। घडवून महाभारत केला अधर्माचा नाश| तुझी लीला पाहून तुज म्हणती लीलाधर| तव मुखकमल पाहता जुळती माझे कर| Sp..'
161
People Reached
6
Engagements
3