मतदान..
निवडणुकीच्या प्रक्रियेला
मतदान न म्हणता
मतऋण म्हंटले पाहिजे..
मग निवडून येणाऱ्या नेत्याने
स्वतःचा विकास न करता
देशाचा विकास करून
ते परिश्रमच्या व्याजासह
मनापासून फेडलं पाहिजे..
तेव्हाच कुठे
या प्रक्रियेला खरा अर्थ येईल
आणि
खऱ्या अर्थाने
त्याला मतदान म्हणता येईल..!!
***सुनिल पवार...✍🏽
No comments:
Post a Comment