Thursday, 16 February 2017

|| रामायण ||

|| रामायण ||
========
ऐकलंय मी
त्याने लिहले रामायण
घडण्याआधीच
लोक म्हणतात
त्या आधी तो वाल्या होता..
अनुभावातून
घडला वाल्मिकी
अनुभव हाच
त्याचा गुरु होता..!!

मग कोण असावा नारद
ज्याने
पहिली ठिणगी पेटवली
कळलाव्या की गुरु
त्याने ही किमया लीलया केली..
भस्मसात झाला वाल्या
अन
वाल्मिकीला नवी दिशा मिळाली..!!

कपोल काल्पीत वाटेल तुम्हास
पण द्रष्टे असावेत ते
कारण
सत्य हेच आहे
रामायण आज ही घडतेच आहे
फरक मात्र इतकाचं
आता नारद ते घडवतोय
तेव्हा तो एक होता
आता बरेच आहेत
आणि
त्यांच्याच कृपेने
वाल्मिकीचं पुन्हा
वाल्यात रूपांतर होतंय..!!
*****सुनिल पवार....✍🏽

No comments:

Post a Comment