Tuesday, 23 August 2016

|| कधी बदलणार ?||

|| कधी बदलणार ?||
=============
लहानपणी वाचली होती
आता धुसरशी आठवतेय
झोपी गेलेल्या राजकन्येची गोष्ट..
अन तिच्या सोबत झोपलेली
समस्त प्रजा तथा राज परिवार
आज पुन्हा दिसली स्पष्ट..!!

वाचलं होतं तिला उठवायला
दूर देशातून माहीत नाही कोठून
एक देखणा राजपुत्र आला..
त्याने म्हणे उठवले होते
समस्त राजपरिवाराला अन
झोपलेल्या त्या समस्त जनतेला..!!
तशीच किमया आज घडली
अनुभवतोय तीच गोष्ट नव्याने
मात्र पात्र आहेत आता बदललेली..
इथे मात्र प्रत्यक्षात अनुभवतोय
गोष्टीतल्या राजकुमाराची जागा
समर्थपणे दोन राजकन्येनीं घेतलेली..!!
त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाने
समस्त झोपलेली जनता तथा शासनकर्ते
आता खडबडून जागे झाले..
निदान भासताहेत तरी तसेच
बेटीचे अनन्य महत्व जगी
बेटींनी पुन्हा अधोरेखित केले..!!
प्रश्न आता हाच आहे
की, ही जागलेली समस्त जनता
नक्की किती काळ जागी राहणार..??
का बैल गेला अन झोपा केला असच होणार..?
अहो काळ बदलला दुनया बदलली
आम्हा भारतीयांची मानसिकता
सांगा ना कधी बदलणार..??
*****सुनिल पवार....✍🏽

No comments:

Post a Comment