Thursday, 27 April 2017

|| भीष्म बळी ||

|| भीष्म बळी ||
==========
शरपंजरी पडलेल्या भीष्मांचं शल्य
नाहीच कुणी का कधी जाणले..?
तोंडचं पाणी हिरावण्यास पहा
अर्जुनाने ही धनुष्य ताणले..!!

त्याचीच होती ही भूमी सारी..
अन, त्यानेच होता शकट हाकला..
एकनिष्ठतेचा निष्ठावान पाईक
त्याच्याच मातीत उपरा ठरला..!!
जगणे केले मुश्किल जगाने
मरणानेही ना प्रश्न सुटले..
इच्छा मरणाचे वरदान असे
त्याच्यावर हे कोणी लादले..?
अथक लढतोय अजून स्वतःशी
मार्गात परी कैक शिखंडी..
निष्प्रभ होती प्रयत्न सारे
कोण सोडविल मृत्यूच्या गाठी..??
****सुनिल पवार....✍🏽

No comments:

Post a Comment