Wednesday, 21 September 2016

|| प्राक्तनी ||

|| प्राक्तनी ||
========
उमलण्या आधीच
कळ्यांच्या प्राक्तनी ओघळणे येते..
ऋतू कोणताही असो
पानांचे नेहमीच गळणे असते..!!

साचलेले डबके असो
वा असो पाणी खळखळते..
संकुचित दगडांचे तसेच
वरवरचे हिरवळणे असते..!!
किती जपावे आरशास
ओरखड्या पासून, कशास ते..?
नुसत्या स्पर्शानेही नशिबी त्याच्या
डागाळणे असते..!!
माथ्यावरील सूर्याचे
शाश्वत जरी कवडसे ते..
एक मेघ साशंक अन
आसमंताचे ढगाळणे असते..!!
किती गायिले गोडवे जगी
चंद्र, चांदण्याच्या प्रीतीचे ते..
वातीच्या नशिबी केवळ तेच
रात्रीचे जळणे असते..!!
****सुनिल पवार...

No comments:

Post a Comment