Saturday, 16 March 2019

अस्तित्व...

अस्तित्व...

सागरात विलीन होऊनही
नदीने आपले अस्तित्व जपायला हवे..
तिच्या दृढ संकल्पाचे पाणी
बारा महिने कायम टिकायला हवे..!!
पण दुर्दैव असे की,
फार मोजक्या नदीच्या नशिबी
असे भाग्य लिहिलेले दिसते..
बाकी चार दिवसाचा पावसाळा वाहतो
नंतर पात्र कोरडे रुक्ष होते..!!
आधार घ्यायचाच झाला तर
नदीने तो हिमालयाचा घ्यावा..
पाऊस तसा लहरीच असतो
त्याचा भरवसा कोणी द्यावा..!!
शेवटी इतकेच सांगेन
की भावनेत वाहत जाऊन
रिते होण्यापेक्षा
संयत वाहून आपले अस्तित्व
टिकवून ठेव..
ते नाही, तर तू जीवन आहेस
इतके मात्र तू कायम स्मरणात ठेव..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment