Saturday, 9 March 2019

जावईशोध...

जावईशोध...

आता नदीने
माघारी फिरायचे ठरवले
म्हणून सागर 
चार पावलं सोडायला निघाला
आणि गहजब झाला..!!
काठावरच्या संधीसाधूंना
चघळायला विषय मिळाला
कोणी म्हणाले
नदी बदफैली झाली
तर कोणी म्हणाले
सागर बाईलवेडा निघाला..!!
बिचाऱ्या
खडकांनी आडोसा घेतला
वाऱ्याने कानोसा घेतला
काही वेळ
विषयाचे थवेच्या थवे उठले
अन् तसेच माघारी फिरले..!!
उद्या
पुन्हा जमतील ते तिथे
नवीन खाद्य शोधायला
किनाऱ्यावर
उमटलेली पावलं खोदायला
आणखी एक नवा
जावईशोध लावायला..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment